शूर्पारक अष्टागर
______दमणगंगेपासून मुंबईपर्यंतच्या प्रदेशाला 'शूर्पारक' आणि शुर्पारकाच्या दक्षिणेकडील कुण्डलिकेपर्यंतच्या प्रदेशाला 'अष्टागर' अशी नावे होती.शूर्पारक हे नाव प्राचिन तर अष्टागर हे नाव अर्वाचिन आहे.शूर्पारक म्हणजे हल्लीचे 'सोपारा'.हे या प्रदेशाचे नाव होते व त्यांतील मुख्य ठाण्याचेही.भोवतालच्या खाड्या उथळ झाल्याने हल्ली त्याला फारसे महत्व उरलेले नाही.त्यामुळे त्याचा सामावेश आता 'वसईंत'करण्यात आलेला आहे.यद्नकुंडातून निघालेल्या सुपाच्या सहाय्याने परशुरामाने हि भूमी निर्माण केली म्हणून या प्रदेशाला शूर्पारक-सोपारा हे नाव मिळालेले आहे,अशा दंतकथा आहेत.जेथे नारळी व पोफळीची झाडे दाट उगवतात अगर मीठ पिकवतात अशा स्थळांस 'आगर' म्हणतात.समुद्राच्या भारतीय कक्षेत असेलेल्या सखल,सपाट,कोरड्या व खार्या जमिनींत मीठ पिकतें आणि गोड्या पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असेल तेथे नारळी सुपारीची आगरें असतात. "अलिबाग,नागांव,थळ,चौल,सासवने,साखर,अक्षी व किहीम हा आठ प्रसिद्ध आगरें या भागांत आहेत." सलग आठ आगरे लगोलग आल्याने या भागांस आता 'अष्टागर' अशी संद...