पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजगडवरील ती स्मारकशिळा-नवनाथ आहेर

"हि तो नरविरांची मांदियाळी..!" "सदर फोटोत दिसतोय तो एक 'स्मारक शिळे'चा प्रकार आहे.आयताकार उभट प्रकारची शिळा व वरच्या बाजूस दिवा बत्तीची सोय,काही शिळांना मध्यभागी दिवा लावण्यासाठी कोनाडा असतो. तात्कालीन कालखंडात विरगळ सोबतच काही ठिकाणी अशाही स्मारक शिळा उभारल्या जायच्या.देव,देश,धर्मासाठी आपला देह त्यागणार्या विराच्या प्रती ती एक निष्ठा वाहण्याचा हा एक प्रयत्न होता अशीच एक स्मारक शिळा तुम्हाला रायगडस्थित शिर्काई देवीच्या नविन घरट्याच्या मागेही दिसेल अन्यही काही ठिकाणी अशा स्मारक शिळा मी पाहिल्या आहे. वरील फोटो हा राजगडाच्या सुवेळा माचीच्या सोपान मार्गाने बिनीच्या बुरुजाकडे जातानाचा आहे. सोबतचे गणेश शिल्प मात्र नविन वाटते आहे.पण,हा एक विरोधाभास आहे की ज्या शुर विरांच्या रक्ताने या भूमीला अभिषेक झाला तेव्हा आपले देव देव्हार्यात सुरक्षित राहिले.पण,दुर्दैव आम्ही भुमीपुत्र यांच्या त्यागाला विसरलो.गणेश शिल्पाला छान शेंदूर लावलेला आहे(हे ही चुकच आहे.कुठल्याही वास्तूला शेंदूर वा रंग लावणे हे पुरातत्व खात्याच्या नियमांच्या विरोधात आहे.तसेच असे केल्याने मुळ शिल्पाचे नुकसान ह...

सह्याद्रीनामा

सह्याद्री- धन्वदुर्गं महीदुर्गम् अब्दुर्गं वार्क्षम् एव वा। नृदुर्गं गिरिदुर्गं वा समाश्रित्य वसेत् पुरम् ॥ सर्वेण तु प्रयत्नेन गिरिदुर्गं समाश्रयेत्। एषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गं विशिष्यते ॥  (मनुस्मृति ७.७०–७१) "धनुदुर्ग(सभोंवार वीस कोसा पर्यंत उदकरहित प्रदेशांने युक्त असलेला दुर्ग),महीदुर्ग(बारा हातांहून उंच,युद्धार्थ वरुन फिरतां येईल एवढा रुंद व आणि आवरणयुक्त दुर्ग,अब्दुर्ग(जलाने परिवेष्टित असा दुर्ग),वार्क्ष दुर्ग(तटाबाहेर चार कोसपर्यंत मोठमोठे वृक्ष,कांटेरी झाडें व जाळ्या यांनी व्याप्त असलेला दुर्गं),नृदुर्ग(हत्ती,घोडे,रथ व पायदळ यांनी रक्षित असा दुर्ग)आणि गिरिदुर्ग (ज्यावर चढण्यास एकच मार्ग आहे,ज्यावर जलसंचय,वृक्ष व धान्य निर्माण करणारी क्षेत्रे आहेत असा दुर्ग)यापैंकी कोणत्या तरी एका दुर्गाचा आश्रय करुन नगर रचावें.या सर्व दुर्गांत अनेक गुणयुक्त असलेला गिरिदुर्ग प्रश्स्त आहे.यास्तव प्रयत्नेकरुन त्याचा आश्रय करावा." _____गिरिदुर्गांचे ठायीं देवादिकांचा निवास असतो.गिरीशिखरांवर देवादिकांची स्थाने असतात अशी सर्वसाधारण समजूत असल्यामुळे मनूने उद्गार काढले आहेत की,गिरिदुर्गी...

निशाण आणि शस्त्र-नवनाथ आहेर

"निशाण आणि शस्त्र" ____हे कुठल्याही राज्याच्या महत्वाच्या निव असतात. राज्याचे निशाण पडले तर राज्य पारतंत्र्यात अर्थात दुसर्याच्या ताब्यात जाते.कुठल्याही वारफेअर मध्ये निशाण हि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.म्हणून निशाणाला राखण्यासाठी शस्त्राचा वापर करावा लागतो.या एकमेकांना पुरक गोष्टी आहेत.निशाण राखण्यासाठी शस्त्र तर स्वराज्य राखण्यासाठी निशाणाचे रक्षण.याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वराज्या चरणी अजन्म निष्ठा वाहणारे एक मातब्बर सरदार नव्हे ते स्वत:च एक राजेच होते ते म्हणजे कान्होजी नाईक जेधे यांचे पुत्र बाजी जेंधेंच.लढाई खळद बेलसरची साल होत १६४८ फत्तेखानाच्या मुसक्या आवळायच्या अस माहाराजांनी ठरवले न पुरंदराहून फत्तेखानाच्या छावणीच्या दिशेने बिनीच्या तुकडीने कूच केले. तिच्यामागोमाग इतरही मावळे निघाले. सगळ्यात शेवटी निघाली भगव्या झेंड्याची तुकडी. या तुकडीत एका जवान मावळ्याच्या हाती भगवा झेंडा होता. या तुकडीत तगडे पन्नास-पंचावन्न आडदांड मावळे सामील झाले होते. पुरंदराहून हे वादळ फत्तेखानाच्या छावणीच्या रोखाने खळद-बेलसरकडे घोंघावत निघाले. भगवा झेंडा वार्‍यावर फडफडत होता! मराठ्यांच्या त...

सह्याद्रीनामा

______चालुक्य,राष्ट्रकुट,यादव ही साम्राज्यें मैदानीं होती.सातवाहनाच्या सत्ते प्रमाणेच यांचाही प्रारंभ सह्याद्रीच्या दर्याखोर्यांतच झाला आणि पठारावर व सुपिक मैदानांवर विस्तार झाल्यानंतर त्यांचे सह्याद्रीकडे दुर्लक्ष झाले.ज्यामानाने सह्याद्रीत त्यांनी भिस्त ठेवली म्हणजे अवलंबून राहिले ते पर्यंतच ते टिकले.जेव्हा ते केवळ मैदानी तयारीवर अवलंबून राहिले तेव्हा परकीय आक्रमकांच्या पहिल्या झटक्यातच कोलमडून पडले.ज्या प्रमाणे जास्तिच्या पाण्याने एखादे धरण फुटते व आजूबाजूचा सर्व प्रदेश नष्ट होतो.शेतीवाडी,घरे वाहून जातात व रहिवाशी परागंदा होतात तद्वत यांच्या मैदानी राजधान्यांचा पराभव होताच त्यांच्या सत्ता सर्वभक्षी काळाच्या ओघात लुप्त झाल्या.त्यांच्या साम्राज्याची धुळधाण झाली.मैदानी लढाईत आघाडीवरची एक फळी फुटली तरी घाटमाथ्यावर पिछाडिल एक फळी सज्ज खडी असे काही नियोजन यांनी केलेले नव्हते.याऊलट सातवाहन व चालुक्यांनी अपरान्त(कोंकण),कर्नाटक व आंध्र या प्रदेशांत आपले पाय घट्ट रोवले होते म्हणूनच त्यांची सत्ता इतर राजवंशाहून आधिक टिकली.यांचेही प्राथमिक  पराभव यांचेही झाले पण यी पराभवानंतर ते पुन्हा उसळी...

सह्याद्रीनामा

"न त्यासाठी आम्हाला कातळ कड्यांशी सलगी करावीच लागेल,निडर होऊन मनाच्या भितीशी दोन हात करावेच लागतील....! "सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही. या सह्याद्रीतील कित्येक मराठी मनांनी आपल्या अस्थिपंजरांचा या उंचीच्या वाढिला हातभार लावला आहे.सह्याद्रीत जन्माला आलोत म्हणजे हा काही नुसता योगायोग नाही येथील मनांनी स्वातंत्र्यदेवतेला आपल्या रक्ताने अभिषेक घालणार्यांची हि समरांगणभूमी आहे.त्या आपल्या पुर्वजांचे पांग फेडण्यासाठी आम्हाला निदान तो  तेजोमय दिव्यासम तेजस्वी व ओजस्वी इतिहास मनात जपता यायलाच हवा."  न त्यासाठी आम्हाला कातळ कड्यांशी सलगी करावीच लागेल,निडर होऊन मनाच्या भितीशी दोन हात करावेच लागतील....! "सह्यगिरीतिल वनराजांनो, या कुहरातुनि आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे एक हिमाचल राखायाला करा हिमाचल लक्ष खडे समरपुरीचे वारकरी हो, समरदेवता बोलविते खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते..! "कुसुमाग्रजांनी वर्णन केल्याप्रमाणे या कड्यां ...

समरभूमी उंबरखिंड-नवनाथ आहेर

समरभूमी उंबरखिंड:- मराठ्यांच्या इतिहासाची गौरवशाली गाथा.... (विजयदिन - 2 फेब्रुवारी) "समरभूमीचे सनदी मालक,                   शतयुद्धाचे मानकरी, रणफंदीची जात आमुची,                    कोण आम्हा भयभित करी.....! ______भारताच्या इतिहासात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले.महाराणा प्रतापसिंह सारखे प्रसंगी वनवास भोगला.पण, देशासाठी प्राण अर्पण करणारे रणधुरंदर पराक्रमी योद्धे या हिंदुस्थानात जन्माला आले.पुढे हाच वारसा घेऊन पुढे शहाजीराजे शिवराय,संभाजीराजे जन्माला आले.देव देश धर्माच्या रक्षणार्थ झुंजते झाले.शिवरायांनी आपल्या हयातीत पाचशेहून आधिक लढाया केल्या.मला माहीत असलेल्या पाचशे लढाया अाहेत.ज्यात शिवराय प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सामील होते. ______कंबरेला नागव्या असिलता अडकवुन रानोमाळ दौड घेणार्या व रणनवर्याची जात सांगणार्या बारा मावळ व सात नेर्यांतील,कोकण,तळकोकणातील  माणसांना एकत्र करुन मोघल व इतर पातशाह्यांविरूद्ध झुंज देणारे शिवराय हे एक अद्वितीय योद्धे होत.. पेण पासुन पुर्वेकडे पंधरा मैलावर अस...

जावळीच्या रानांत-नवनाथ आहेर

______६ मे १६५६ जावळीला चक्काचूर केले व राजे पन्हाळ्यावर दाखल झाले. या बाबत कवी भूषण लिहतात. ​ "चंद्रावल चूर करी, जावलीज पत्थ कीनो।  ...........….  आफजल मारी डालो, तबल बजायके।  ये दिल सो बे दिलर हम कहे बार बार।  अब कहां सुख सिंह सिव ही जगायके।  भेजना हे भेजो सोरीसाले सिवराज जूकी।  बाजीगर नाले परनाले पर आय के ।  बाजीगर नाले परनाले पर आय के।" ​ ____६ मे १६५६ चंद्ररायाच्या जावळीला जी एके काळी "द युनायटेड नेशन ऑफ जावळी" नावाने संबोधली जायची.त्या मातब्बरास अवघ्या २५ व्या २६ व्या वर्षी टक्कर देणारे शिवराय हे अद्वितीयच...! ​ १६४८ साली जावळीचा चंद्रराव ( दौलतराव ) मोरे यांचा मृत्यु झाला. दौलतराव हा निपुत्रिक असल्यामुळे त्याच्या पत्नीने शिवरथकर मोरे या घराण्यातून एक मुलगा दत्तक घेतला त्याचे नाव यशवंत. त्याला शिवरायांच्या सहाय्याने गादीवर बसवला. "चंद्रराव" कीताब धारण केला. पण,प्रत्यक कारभार   मोरे यांच्या पैकी हणमंतराव पाहु लागला. गेल्या नऊ पिढ्या मोरे या जहागिरीचा उपभोग घेत होत्या. ​      एके दिवसी आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोर्‍यांची द...

शिवरायांची बसरुर(बेदनूर)(उडुपी कुंदापूर तालूका) मोहिम व त्या नंतरचा त्यांचा दरारा अस्सल साधनांतून व पत्रांतून...

"शिवरायांची बसरुर(बेदनूर)(उडुपी कुंदापूर तालूका) मोहिम व त्या नंतरचा त्यांचा दरारा अस्सल साधनांतून व पत्रांतून......" ८ फेब्रुवारी १६६५ _______________________________________ इ.स १६६५ मार्च १४. कारवार(मास्टर)-सुरत प्रेसिडेंट. "फेब्रुवारीच्या आरंभी ८५ लहान व तीन मोठी गलबतें घेऊन शिवाजीराजे मालवणांतून बाहेर पडले,ते गोव्यावरुन कांहिहि विरोध झाल्याशिवाय बार्सिलोरपर्यंत जाऊन,ते बंदर लुटून,गोकर्णला परत आले." -शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र क्रमांक१०४४ _________________________________________ "शके १५८६ माघ मासी राजश्री जाहाजांत बैसोन बसनुरास गेले.तें शहर मारुन आले." -जेधे शकावली _________________________________________ "बिदनुरीं शिवानाईक जंगम होता.त्याचे शहर बसनूर म्हणून थोर नामांकित होतें.दर्याकिनारा,तेथें पाळती पाळवून पाळती आणूंन,वरघाटे जातां मार्ग नाही.म्हणून पाणियांतील आपलीं जाहाजें आणून सिद्ध तरुन आपण राजे खासा जाहाजांत बसून जाऊन बसनुरास एकाएकीं दिवस उगवीवयासी गेले.शहरचे लोक बेहुशार होते.एकाएकी जाहाजांतून खाली उतरले.शहर मारिले.एक दिवस शहर लुटून फन्ना क...

पानिपत रणसंग्राम स्मृतीदिन-नवनाथ आहेर

_______आज १४ जानेवारी पानिपत संग्राम स्मृतीदिन.   १४ जानेवारी १७६१  पानिपतचा युद्धप्रसंग म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक अविस्मरणिय घटना होय.मराठ्यांशी टक्कर देत देत अखेर याच मातीत संपलेला औरंगजेब व त्यानंतर दिल्ली व मोंगल साम्राज्य जवळपास संपुष्टातच आले होते.खुद्द मोगलांचे सरदार,निजाम,आयोध्येचे नवाब ,रोहिले इ.सर्व स्वतंत्र्य झाले होते.राज्य वाढविण्याचा तर सोडाच पण राज्य टिकविण्याचीही शक्ती आता मोंगल सत्तेत शिल्लक राहिली नव्हती.त्यातूनच नादिरशहाच्या स्वार्यांपासून वायव्येकडूऩ आफगांचे हल्ले हिंदुस्थानावर होऊ लागले होते.पंजाबचा सुभा हि आफगाणी  आक्रमणे पेलूं शकला नाही व राज्याची सरहद्द दिल्लीतपर्यंत येऊन पोहोचली.अशावेळी दिल्लीच्या मदतीला कुणीही धावून गेले नाही गेले ते फक्त मराठे.      ' मोगल साम्राज्यात आपला प्रभाव बसवून सम्राटांना आपल्या ताब्यात ठेवून सबंध हिंदुस्थानावर आपला आधिकार बसवावा अशाच महत्वकांक्षा मराठ्यांनी मनी बाळगली होती.'        आणि याच सुमारास वायव्येकडून होणारे आफगाणी हल्ले हे भारतीयांचे शत्रू निर्माण झाले.या हल्ल्यांना तो...

किल्ले सुधागड(नविन माहिती) - नवनाथ आहेर

______किल्ले सुधागड असे इंटरनेटवर सर्च केल्यावर फोटोत आहे ती माहीती आपल्याला दिसते.मग विकिपीडीया,साईट,वा ब्लॉग कोणताही असो.पण या सर्वांवर एकच माहीती दिसतेय. १)माहीतीमध्ये सर्रास सुधागडला भोरपगड असे नाव दिलेले आहे.अर्थात मी ही पुर्वी असेच बोलत होतो.पण गेल्या तिनेक वर्षात सुधागडाचा निटसा अभ्यास झाल्याने अस लक्षात आले की शिवपुर्व कालखंडात किल्ले सुधागडचे नाव हे फक्त 'भोरप' असे होते.शिवाजी महाराजांनी  गुरुवार,११ सप्टेंबर १६५६  रोजी बहुतांशी गडांचे नव्याने नामकरण केले.त्यात सुधागडाचेही नामकरण झाले असावे.त्याच्या आधी समकालीन साधनांत  सुधागडास केवळ 'भोरप' असे नाव असल्याचेच उल्लेख मिळतात.तसेच स्थानिक वृद्ध लोक फक्त 'भोराई देवीचा डोंगर' असे संबोधतात. २)इंटरनेटवरील माहितीतील दुसरा उल्लेख म्हणजे शिवाजी महाराजांनी इ.स.१६४८ रोजी भोरप जिंकून स्वराज्यात आणला.हा उल्लेख योग्य आहे. त्यास खालील पुरावे प्रमाण आहेत. *शिवाजी महाराजांनी कांगोरी,तुंग तिकोना,लोहगड,राजमाची,कुवारी,भोरप,घनगड,केळंजा,आदि किल्ले घेतले. -मल्हार रामराव चिटणिस बखर *शिवाजीराजांनी कांगोरी,तुंग,तिकोना,भोरप,कुंवारी,...

जावळीच्या रानांत-नवनाथ आहेर

"जावळीच्या रानांत...." "आपल्या बुद्धिवैभवे व पराक्रमे कोणाची गणना न धरिता(करीता), कोणावरी चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणास आणिले, कोणावरी छापे घातले, कोणामध्ये परस्परे कलह लाऊन दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरीयात सिरोन मारामारी केली, कोणासी एकांगी करून पराभविले, कोणासी स्नेह केले, कोणाचे दर्शनास आपणहून गेले, कोणास आपले दर्शनास आणिले, कोणास परस्परे दगे करवले, जे कोणी इतर प्रयत्ने ना कळे त्यांचे देशात जबरदस्तीने स्थळे बांधून पराक्रमे करून आकळीले." ______खुद्द शिवाजीराजे व मावळे चाळीसहजार घोऊन रात्री चालोन तिसरे रोजी श्रीमहाबळेश्वरावरुन निशाणीचा घाट उतरुन जाऊलीस गेले.रघुनाथ बल्लाळ सबनविस व माणकोजी दहातोंडे सरनौबत त्या समागमें फौज देऊन रडतोंडीच्या घाटें तिकडून ते आले.जाऊलीस वेढा घातला.दोन प्रहर पावेतो भांडण झाले.गांव घेतला.बाजीराऊ आणि कृष्णाराऊ राजे मोरे पंधरा सोळा वर्षाची उमर होते.त्यांस स्रीयांदेखील कैद केले.मत्ता द्रव्य बहुत पुरातन राज्यभंग केला.चंद्रराऊ मोरे घेऊन पुण्यास आले. -९१ कलमी बखर _____थोडा सरंजाम केला.त्यांणी(मोरेंनी) अमानुष कृती केली.तस्मात त्या जाग...

सह्याद्रीनामा

______चालुक्य,राष्ट्रकुट,यादव ही साम्राज्यें मैदानीं होती.सातवाहनाच्या सत्ते प्रमाणेच यांचाही प्रारंभ सह्याद्रीच्या दर्याखोर्यांतच झाला आणि पठारावर व सुपिक मैदानांवर विस्तार झाल्यानंतर त्यांचे सह्याद्रीकडे दुर्लक्ष झाले.ज्यामानाने सह्याद्रीत त्यांनी भिस्त ठेवली म्हणजे अवलंबून राहिले ते पर्यंतच ते टिकले.जेव्हा ते केवळ मैदानी तयारीवर अवलंबून राहिले तेव्हा परकीय आक्रमकांच्या पहिल्या झटक्यातच कोलमडून पडले.ज्या प्रमाणे जास्तिच्या पाण्याने एखादे धरण फुटते व आजूबाजूचा सर्व प्रदेश नष्ट होतो.शेतीवाडी,घरे वाहून जातात व रहिवाशी परागंदा होतात तद्वत यांच्या मैदानी राजधान्यांचा पराभव होताच त्यांच्या सत्ता सर्वभक्षी काळाच्या ओघात लुप्त झाल्या.त्यांच्या साम्राज्याची धुळधाण झाली.मैदानी लढाईत आघाडीवरची एक फळी फुटली तरी घाटमाथ्यावर पिछाडिल एक फळी सज्ज खडी असे काही नियोजन यांनी केलेले नव्हते.याऊलट सातवाहन व चालुक्यांनी अपरान्त(कोंकण),कर्नाटक व आंध्र या प्रदेशांत आपले पाय घट्ट रोवले होते म्हणूनच त्यांची सत्ता इतर राजवंशाहून आधिक टिकली.यांचेही प्राथमिक  पराभव यांचेही झाले पण यी पराभवानंतर ते पुन्हा उसळी...

तेवेनापट्टम(कुडालोर)-नवनाथ आहेर

______शिवरायांच्या राजाभिषेकानंतरच्या दक्षिणदिग्विजयाच्या वेळीच्या या घटना आहेत.राजधानी रायगडपासून १२०० ते १५०० कि.मी. अंतरावर असणार्या जिंजी व परिसरांत मराठ्यांच्या पराक्रमाची पाऊले रजलेली आहेत.तेवेनापट्टम, वालदूर,  कोल्हारकोट,बाळपूरकोट,त्रिवादीकोट व कोलेेरुन नदीचा काठ आम्हा महाराष्ट्रातील पोरांना प्रेरणा देतो आहे...!  हजारो मैल अंतारावर कधी काळी उधळलेला  विजयाचा बेल भंडारा आम्हाला आमच्या पुर्वजांच्या अस्तित्वाची जाणिव करुन देत आहे...! म्हणून म्हणतो की वाचलंच पाहिजे...!  कागदं बोलतात...!  ______________________________________ इ.स.१६७७ जुलै ९ मार्टिन रोजनिशी (मार्टिन हा पाँडेचेरी येथील फ्रेंच वखारीचा मुख्य आधिकारी होता.याने लिहलेली हकीकत सर जदुनाथ सरकार यांनी इस. १९२४ मध्ये प्रसिद्ध केली. त्यातील काही भाग.)  तेवनापट्टम किल्ल्यांतील लोक भिऊन पळाल्यामुळे तेवेनापट्टम(कुडालोर) किल्ला मराठ्यांनी घेतला. पत्रसार संग्रह खंड-३ कागद क्रमांक-२७६७ ______________________________________ इ.स.१६७७ ऑगस्ट २ नेलोररामाण्णा To  ग लँघॉर्न(इंग्रज) From place-  तंदुमगु...

किल्ले सोनगड(सोनगढ दुर्ग)नवापूर महाराष्ट्र गुजरात बॉर्डर-नवनाथ आहेर

*मराठ्याच्या पाऊलखुणा जपणारा सोनगड(सोनगढ दुर्ग) *      (नवापूर महाराष्ट्र गुजरात बॉर्डर,सोनगड)  ______महाराष्ट्रात सोनगड नावाचे मला माहीत असलेले ३ किल्ले  आहेत.एक म्हणजे सर्वांना माहित असलेला रायगडजवळील महाडच्या वाटेवरचा चांभारगडजवळील सोनगड, दुसरा सिन्नर ठाणगाव मार्गाजवळील सोनेवाडी गावाच्या बाजूला खंडोबाचे देवस्थान असलेला सोनगड व तिसरा म्हणजे गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवरील नवापुर जवळील सोनगड.कामाच्या निमित्ताने महिन्यातून गुजरातला जाणे होतेच होते.नवापुर बॉर्डर क्रॉस केल्यावर थोडे पुढे गेले की सुरत कडे जाताना उजव्या रस्त्याला एका डोंगरावर भगवा झेंडा भडकताना दिसायचा.सह्याद्री भटकंतीचा अनुभव असल्याने लक्षात येत होते की येथे किल्ला आहे मात्र कोणता? किल्लाच आहे की एखादे मंदिर आहे हे मात्र माहीत नव्हते.मागिल वर्षी शिवजयंतीच्या काही दिवस अगोदर बडौद्याला निघालो असताना बॉर्डरजवळ मुक्काम करण्याची वेळ पडली.मग मात्र या सोनगड गावात जायचा योग आला.काही दिवसांनी शिवजयंती होती तिथे मुख्य रस्त्याच्या आत एक महाराजांचा पुतळा आहे तेथे शिवजयंतीची तयारी चालू होती.स्थानिकांना विचारले तेव...

अजिंठा डोंगररांगेचे महात्म-नवनाथ आहेर

*अजंठा डोंगररांगेचे महात्म* ______सातमाळा, बालाघाट व महादेव या सह्याद्रीच्या मुख्य पर्वत शाखा आहेत.सातमाळ्याची रांग ही खानदेश व नाशिक या जिल्ह्यांच्या सिमेवर आहे आणि चांदूर उर्फ अजंठा ही आग्नेयेकडे थोडीशी कललेली आहे व ती नाशिक जिल्ह्यातून जाते. अजंठा रांगेतील किल्ल्यांची बांधणी ही महत्वपुर्ण आहे. या श्रेणीतील मुख्य किल्ले म्हणजे अंकाई-टंकाई, देवगिरि, राजधेर वगैरे किल्ल्यांची रचना पाहिल्यास आपल्या लक्षात येते की या किल्ल्यांना तोडलेले कडे आहेत आणि यांची प्रवेशद्वारे ही विवरांतून निर्माण केलेली आहे.अजंठा रांगेतील किल्ल्यांना दोन कारणांमुळे महत्व होते व हि दोन कारणे केवळ खानदेश वा नाशिक परिसर नाही तर  महाराष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची होत. १)पहिले कारण म्हणजे अजंठा रांगेतील शेवटचा किल्ला म्हणजे देवगिरि होय व हा किल्ला यादवांच्या राजधानीचा किल्ला होता अर्थात त्या दृष्टीने किल्ल्याची संरक्षणात्मक रचना केली गेली होती.  २)अजंठा डोंगररांग म्हणजे महाराष्ट्राचे रक्षण करणारी एक अत्यंत महत्वपुर्ण फळी आहे.हि फळी एकदा  तुटली की मग आश्रय उरला तो केवळ सह्याद्रीचाच.अजंठा पर्व...

मानाजी पायगुडे-नवनाथ आहेर

______दिल्लीपती पातशहा शहेनशां ए हिंदुस्थां म्हणवून घेणारा औरंगजेब.४ एप्रिल १६७० नरवीर तानाजी मालुसूरेंनी कोंढाणा जिंकला तेव्हापासून मराठे व औरंगजेबाचा सुरु झालेला हा रणसंग्राम अखेर ३ मार्च १७०७ मध्ये नगरमधील भिंगार या गावी तब्बल ३७ वर्षाच्या प्रदिर्घ कालखंडानंतर संपला.मरेपर्यंत औरंगजेब या शिवराय निर्मित स्वराज्याशी व या बेलाग बुलंद सह्याद्रीशी टक्कर घेत होता.पण मराठे काही त्याला बधले नाहीत.मराठ्यांनी तितक्याच निकराने व बेताने औरंगजेबास जेरीस आणला.अखेर तो संपला.पण, त्याच्या मृत्यूनंतर दिल्लीची जी काही अवस्था झाली ती अत्यंत दयनीय होती.औरंगजेबाला एकूण पाच मुले होती.त्यातील एका मुलाला मुहम्मद सुल्तान ला औरंगजेबाने  स्वत:च मारले होते व आता दुसरा पुत्र अकबर याच्या मागे तो दख्खनेत त्याचा पाठलाग करत होता.उरलेल्या ३ शाहजाद्यांमध्ये आता तख्तासाठी भांडण लढाया सुरु झाल्या.त्यातील मुहमद आझम व मुहम्मद मुअझ्झम यांच्यात जजाऊला लढाई झाली व नंतर मुहम्मद मुअझ्झम दिल्लीच्या गादीवर आला.त्याने नंतर आपला शेवटचा भाऊ मुहम्मद कामबक्षलाही ठार केल.त्यानंतर बादशहा मुअझ्झमचाही मृत्यू झाला.... अशाच प्रकारे दिल्...

आपली प्रार्थनास्थळे-नवनाथ आहेर

_____मंदिर असो वा कुठलीही प्रार्थनास्थळे ही सध्या कोरोनामुळे बंद करण्यात आली आहेत. त्यावर अनेक सज्जनांच्या खालील मेसेज व पोष्ट सोशल मिडियावर दिसत आहेत. "देवाला दिसत नाही का आजार,व्हायरस? जर देवालाच आजार होतो तर काय उपयोगाचा देव. देऊळे सोडून दवाखाने बांधले पाहिजेत. वगैरे वगैरे...!" तर मित्र हो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दवाखाना ते बांधने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे यात दुमत नाहीच.   तर ,सर्वात महत्वाची गोष्ट की स्वत:ला नास्तिक म्हणवून घेणारा व्यक्ती हा सर्वात मोठा आस्तिक असतो मी असे बोलतोय यामागेही सायकोलॉजी आहे.मुळात हे मेसेज पसरविणारे जे लोक असतात ना ते खालील प्रकारातील असतात. १)सेक्यूलर(ना घर का ना घाट का) २)देवाला न माननारा(नास्तिक) ३)सुशिक्षित लोक्स ४)सर्व नवस फेल गेल्यावर प्रचंड नैराश्यात व देवावर राग असणारे लोक्स(स्वत:च्या कर्तृत्वावर भरवसा नसलेले लोक्स) आणखी काही आहेत/असतील.....! तर,मुळात हे लक्षात घेणे गरजेचे आहे की मंदिरांचे निर्माण वा मुर्तीपूजा कशासाठी? मुर्तीपूजा केवळ हिंदू धर्मात आहे हा निव्वळ गैर समज आहे.सर्व धर्मांत मुर्तीपुजा(स्थानपुजा) आहे.त्या त्या धर्माच्य...

इंदुरीचा किल्ला(गढी) व दाभाडे घराणे-नवनाथ आहेर

इंदुरीचा किल्ला(गढी) व दाभाडे घराणे- "बजाजी पाटील हे दाभाडे घराण्याचे  मुळपुरुष होय. मौजे तळेगांव,तालुके-चाकण,सरकार-जुन्नर,सुभे-औरंगाबाद     बजाजी पाटील यांचे पुत्र येसाजी पाटील हे शिवरायांच्या पदरी सरकारात होते.त्यांनी निष्ठेने स्वराज्याची सेवा केली.पुढे महाराज कैलासवाशी झाल्याच्या नंतर संभाजीराजे गादीवर आले.त्यावेळी येसाजी पाटील दाभाडे व त्यांचे पुत्र खंडोजी व शिवाजी दाभाडे हे सरकारात  होते.संभाजी राजेंच्या मृत्युच्या अगोदर संभाजीराजेंनी येसाजीराव दाभाडे यांना राजाराम महाराजांच्या तैनातीस दिले होते.संभाजीराजेंच्या मृत्युनंतर जेव्हा इतिकादखानाचा रायगडास वेढा पडला तेव्हा येसाजीराव पाटील दाभाडे हे राजाराम महाराजांच्या सोबत रायगडावर होते व त्यांच्याबरोबरच ते जिंजीला कर्नाटक प्रांतात गेले. यावेळी जिंजी मुक्कामी राजाराम महाराजांना पुत्ररत्न प्राप्त झाले.त्यावेळी राजाराम महाराजांनी येसाजी पाटील दाभाडे यांना 'इंदुरी' हे गाव वतन म्हणून करुन दिले. त्याचे उल्लेख पुढिल प्रमाणे- "राजशक २३ धातृनामसंवत्सरे सु।। सबांतिसैन  आल्लफचे सालीं श्री.महाराज यांणी पुत्रोत्साह जहाला जाण...

गडकिल्ल्यांचे कालमापन व तर्क

*गडकिल्ल्यांचे कालमापन तर्क वितर्क* _______आपण सर्वचजण सह्याद्रीत भटकत असताना अनेक असे किल्ले पाहतो की ज्या किल्ल्यांच्या वास्तू पुर्णत: नामशेष झालेल्या आहेत.काही किल्ल्यांवर वास्तूंचे चौथरे शिल्लक आहेत मात्र ते ही मातीत गाडले गेले आहेत.तर काही किल्ल्यांवरील इमारतींच्या निदान भिंती तरी शिल्लक आहेत असे आपल्याला दिसते.मग,आपल्या मनात सहज प्रश्न निर्माण होतो की या किल्ल्याचा नक्की कालखंड कुठला असेल बरं?त्या अनुषंगाने आपण पुस्तकांचा वा हल्ली नेटचा आधार घेतो मात्र बहुतांशी किल्ल्यांचा बांधकामाचा काळ हा निश्चितपणे सांगता येत नाही.पुस्तकांमध्येही काही उल्लेख आपल्याला आढळत नाहीत.मात्र एक आहे की किल्ल्यांच्या स्थानांवरुन आणि त्यांच्या बांधकामाच्या पद्धतीवरुन त्यांच्या कालमापनाबद्दल काही निष्कर्ष निघू शकतील असा एक विश्वास वाटतो.परंतु इथेही एक अडचण आहे की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घराण्यांच्या काळात बहुतांशी किल्ल्यांची खुप वेळा डागडुजी झाल्या कारणाने बांधकामाच्या स्ट्रक्चरहून किल्ल्याचे कालमापन करनेही अवघडच आहे.         एक परदेशी प्रवासी सातवाहनांच्या सामर्थ्याचे वर्णन करताना म...

जागतिक वारसा दिन १८ एप्रिल निमित्त-नवनाथ आहेर

"आज जागतिक वारसा दिवस....!" वारसा हा का जपला जावा..? वारसा या शब्दांत नक्की कोण कोणत्या बाबी अंतर्भूत होतात?  त्यांचे संगोपन का महत्वाचे आहे?  त्यांचे संगोपन कशाप्रकारे करायला हवे..?   या 'क' च्या बाराखडीच्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधायला हवीत.आपण काही कामानिमित्ताने म्हणा वा पर्यटनाच्या दृष्टीने एखादा घाट ओलांडतो, इतिहासाचे स्मरण करुन वा प्रेरणा घेत एखाद्या किल्ल्याची दमछाक करणारी चढण चढत असतो किंवा या गिरीशिखरांवरील मंदिरांत भक्तीभावे आपण ती अनघड पायवाट तुडवत जातो.या सर्व कृतींत आपल्याला अनेक प्रकारचे किल्ले, लेण्या, काही पुरातन वास्तू,अनमोल कलाकृती असलेली मंदिरे पाहतो.आपल्याला अनेकदा प्रश्नही पडतो की हि सर्व शिल्पे अशी अडवाटेला का असावीत?  त्याचा अभ्यास आपण करायला हवा.हिंदुस्थानात मोजता येतील अशी साधारण १२०० च्या आसपास लेणी आहेत त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त लेणी ही बौद्ध लेणी आहेत व बाकीची जैन व ब्राम्हणी लेणी आहेत.आपल्या जनरल सह्याद्रीचा गाभा हा कणखर व एकसंधी आहे.खोदकामासाठी उपयुक्त असा दगड दुसरीकडे कुठेही पहावयास मिळत नाही.याच कारणाने व त्या त्या काळतील राजस...